
Artificial Intelligence
रोबोटिक शेती Robotic Farming किंवा आर्टिफिशल इंटेलिजन्स Artificial Intelligence या सर्व नवीन तंत्रज्ञानामुळे शेतमजुरांचे प्रश्न अजून बिकट होतील का ?
आजच्या आधुनिक युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर शेतकऱ्यांसाठी खूप मोलाचे वरदान ठरू शकतो
तन नियंत्रण फवारणी मृदा तपासणी रोग अन्नद्रव्य व्यवस्थापन तसेच काढणी व काढणीनंतरची कामे पोस्ट हार्वेस्टिंग या सर्व गोष्टींमध्ये होण्याची गरज आहे
भारतीय कृषी बाजारपेठ ही जगातील महत्त्वाच्या देशांपैकी एक आहे. या करिता भारतात वाव देखील आहे.
देशातील उत्पादन त्याची नेमकी स्थिती पिकांच्या उत्पादकतेवर होणारा परिणाम याविषयी अचूक भाष्य करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर होत राहील.
देशामध्ये कपास (cotton) डाळिंब (pomegranate) आंबा(mango) तसेच कडधान्य भाजीपाला मसाल्याचे उत्पादन करणारी पिके यासाठी काढणी यंत्रे व पोस्ट हार्वेस्टिंग टेक्नॉलॉजी देशात आलीच पाहिजे. ही गोष्ट भारतीय शेतकऱ्यांना योगदान ठरू शकते.
Drone चा वापर वाढत राहिल्याने शेती क्षेत्रामधील सर्विस कंपन्या तसेच मार्केटिंग या पुरवठा साखळीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर मोठ्या प्रमाणात केला जाईल
आर्टिफिशल इंटेलिजन्स किंवा रोबोटिक तंत्रज्ञान यांचा वापर वाढल्यामुळे काही प्रमाणात रोजगार जातील मात्र नवीन रोजगार तेवढ्याच प्रमाणात तयार होतील लोकांचे स्किल डेव्हलपमेंट होईल
अँड्रॉइडच्या जगामध्ये शेतकरी सुद्धा गुगलची मदत घेऊन कोणतीही माहिती मिळवू शकतो भविष्यात शेतकऱ्यांना कोणतीही माहिती मिळवण्यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही. भारत या कृषिप्रधान देशामध्ये अनेक लोक आहेत जे शेतकऱ्यांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन आपले घर भरतात शेतकरी मात्र यामध्ये रगडला जातो